Bkvarta

खरे स्वातंत्र्य

 खरे स्वातंत्र्य


 स्वभावत:  मनुष्य हा स्वातंत्र्यप्रिय प्राणी आहे. तो स्वतंत्रता देवीचा उपासक आहे. स्वातंत्र्यप्रिय जीवनाचा उपासक आहे. कोणत्याही प्रकारचे बंधन पत्कारायला तो तयार नसतो.  बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना मुक्ज जीवनाचा आनंद लुटावयास वाटतो. त्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. प्राकृतिक बंधन सुटाक्षणीच मनुष्यात्मा मुक्तीच्या प्रवासाची वाटचाल करु लागतो. स्वातंत्र्याच्या अपूर्व अनुभवाचा रस प्राशन करण्यासाठी आज तो रावणराज्याच्या सोनेरी पिंज­यात भाकरी मोठ¬ाकष्टाने खात आहे नव्हे पोटात ढकलत आहे.  त्याचे अशांतीचे, दु:खाचे अश्रू थिजून गेले आहेत.  बंधनाचा हिसका आणि दु:खाचा धसका घेतल्याने स्वातंत्र्यप्राप्ती त्याला आवाक्याबाहेरची वाटते.

 स्वातंत्र्याची अपेक्षा करणे म्हणजे आत्मबलिदानाची तयारी ठेवणे, अज्ञानाची, अशुद्ध विचारांची, गैरसमजुतीची बंधने झुगारून देणे, आसुरी आणि दैवी संप्रदायांच्या संघर्षात दैवी संप्रदायाच्या बाजूने निर्भिडपणे उभे राहणे. कवडीतुल्य जीवन हिरेतुल्य बनविण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणे, विषय विकारांनी बरबटलेल्या दृष्टिवृत्तीची होळी करणे. आपल्या देशाचा इतिहास या गोष्टीला साक्षी आहे.  इतिहासाची गती चक्राकार असते.  या चक्रात आपण बांधले गेलो मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रप्रेमींनी, वीरांगनानंनी, वीरबालकांनी हालअपेष्टा सोसल्या, छातीवर गोळ्या झेलल्या. प्राणर्पण करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.  परंतु मातृभूमीची दास्यत्वातून सुटका झाल्यावर, नव्यानवलाईचे दिवस सरल्यावर आज काय स्थिती आहे, हे सर्वांना आज ठाऊक आहे. परकीय राज्यकर्ते निघून गेले असले तरी सारासार विचार नष्ट झाल्याने पाच मनोविकाररूपी रावणाची सत्ता आपण झुगारून टाकू शकलो नाही. त्यामुळे देहाभिमानाचा कटु वृक्ष कलियुगी फसव्या आकर्षणांच्या शाखांनी दिवसेंदिवस झपाट¬ाने फोफावत आहे. वरवर पाहता सुखद वाटणारी रावणाने दिलेली फळे अंती दु:ख देणारी असली तरी ती आपण आनंदाने चाखत आहोत. आरोपी कोर्टात थोडावेळ पिंज­यात उभा राहतो. परंतु आपण सोन्याचा मुलामा दिलेल्या विकारांच्या पिंज­यात जन्मोजन्मी अडकलो आहोत. धर्म, जात, पंथ, संप्रदायांच्या अन्याय, अयोग्य बंधनाविरूध्य लढा उभारून ती तोडून टाकरणे कठीण आहे, परंतु मी आणि माझे चे सूक्ष्म बंधन तोडून टाकता येत नाही हा अनुभव आहे. सत्ययुग-त्रेतायुगात आपण स्वस्वरुपात राहत असल्यामुळे जीवनमुक्ती अनुभवतो. परंतु द्वापारयुगात आपली अवस्था जटायू पक्षाप्रमाणे होते. परंतु शेवटच्या क्षणी जटायू आणि रामाची भेट झाली व जटायूच्या जीवनाचे सार्थक झाले.  तो जीवनमुक्त झालाञ आपण मात्र अद्याप विकारांच्या बंधनात आहोतञ

 मी व माझे च्या बंधनातून मुक्त करण्यासाठी शिवपिता आपल्याला ई·ारीय ज्ञान देऊन राजयोग शिकवित आहे.  दु:खी करणा­या व आत्मस्वातंत्र्य  हिरावून घेणा­या मनोविकारांचे दान मागत आहे. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शिवपरमात्म्याला मनोविकारांचे दान देऊन त्याची शिकवण आचरणात आणण्याचा दृढ संकल्प करुया.

खरे स्वातंत्र्य – ब्र.कु. नलिनी, पुणे

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *